54 वर्षांपूर्वी आशा भोसले यांच्या प्रसिद्ध गाण्यावर घालण्यात आली होती बंदी, टीव्हीवर चित्रपट दाखवताना गाणं काढून टाकण्यात आलं. मात्र, प्रेक्षकांना ते गाणं इतकं आवडलं की आजही चाहते वेळ काढून ते गाणं ऐकतात.

हिंदी चित्रपटसृष्टीत आजकाल गाण्यांचे बोल आणि त्यामागचा अर्थ बऱ्याचदा वेगळ्या दिशेने जाताना दिसतो आहे. मात्र एक काळ असा होता, जेव्हा गाण्यांना एक वेगळीच ओळख होती. त्या काळातील गाणी लागली की लोक अक्षरशः त्यात हरवून जात असत.
लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांसारख्या दिग्गजांच्या गाण्यांना आजही कोट्यवधी चाहते आहेत. त्याच काळात आशा भोसले यांची गाणीही तितकीच गाजली. मात्र त्यांच्या कारकिर्दीतील काही गाणी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
